अनोळखी

Started by vivek kadam, December 30, 2009, 05:15:28 PM

Previous topic - Next topic

vivek kadam

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो...
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो
जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो
एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जालायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो
जगण्याचे संदर्भ असे क्षनाक्षनालाबदलातात;
आणी म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात
Vivek Kadam

rudra

mitra kavita manapasun avadli :)