प्रेमाचं नातं पवित्र करुन मरणार!

Started by Pritam(prem)pawal, June 15, 2017, 10:31:15 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

*प्रेमाचं नातं पवित्र करुन मरणार*

प्रेमात पडल्यावर माणुस खरचं
खुप आनंदात असतो।
तिला किंवा त्याला पाहिल्या
शिवाय कुठे गप्प झोपतो?
तो त्या व्यक्तिला स्वतः
पेक्षा नेहमीचं जपतो।
आपण प्रेम केलं लग्न ही
करणार यासाठी धडपड करतो।
लग्नाच्यामध्ये येणार्या प्रत्येक
संकटाना तो सामोरे जातो।
लग्न ही होतं त्या दोंघाच
पण तेवढे प्रेम कुठे टिकवतो?
ज्या व्यक्तिला लग्नाआधी कधी
शिवी नाही देतं त्या व्यक्ति वर हात उचलतो।
फक्त शुल्क कारणावरुन
रोजचं घरामध्ये वाद होतो।
वाद पण येवढा की थेटं
कोर्टाच्या दारात जातो।
प्रेमाच शेवटं मात्र त्या
कोर्टाच्या दारात होतो।
एकच प्रश्न माझा त्या व्यक्तिला
आरे जिच्यावर प्रेम केलंस तिलाच
वार्यावर सोडतोस?
कुठं गेलं तुझं प्रेम
तेच जे पहिले होते।
तुम्ही दोंघे ही एकमेंकाच्या
सुखासाठी एकदिवस रडतं होते?
प्रेम करताना जेवढं प्रेम असतं
तेवढं लग्न झाल्यावर राहतं नाही
असं मला वाटतं।
त्यामुळे प्रेम करुन लग्न करनं
आपल्याला कुठं पडतं।
आणि याचं संगळ्या कारणामुळे
मनं लग्नाला तयार नाही होतं।
लग्न करुन तिच्यावरचं
प्रेम कमी करण्यापेक्षा
मी लग्नचं नाही करणार।
शेवटपर्यंत मात्र तिच्यावर
असंच निस्वार्थी प्रेम करणार।
आणि या जगात प्रेमाचं नातं
एक पवित्र नातं करुन मरणार।
प्रेम।
14/06/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/