सगळ्यांनाच नाही जमत

Started by विक्रांत, July 02, 2017, 12:03:12 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

ती तुझी चौकट
सुरक्षितेची
प्रतिष्ठ्तेची
तेवढीच महत्वाची आहे
ती तुझी गरज
समर्पणाची
उडण्याची
तेवढीच आवश्यक आहे
आणि दोन्ही येतात
समोरासमोर
छेडतात एकमेकां
तेव्हा येणारे द्वंद्व
तेही अनिवार्य आहे
यातून निघणारा
सुटकेचा
धोपट मार्ग
तोही निश्चित आहे
कारण शेवटी
समाजबंधन 
व प्रतिष्ठा
हीच प्राथमिकता आहे
असू देत
सगळ्यांनाच नाही जमत 
चालतांना
भर रस्त्यात
बकुळीची फुले वेचणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in