मात्र जगणं अधुरं लागावं

Started by snangareopan@gmail.com, April 26, 2018, 06:01:40 PM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

कधी कोणाच्या मनाला हि
कोणाची तरी नजर लागावी,
तुटावं हृदय कधी नकळत,
आवाज नसावं तुटल्याचा
अन वेदनांना मात्र परिसीमा नसावी.

कोणाच्या शब्दांनी कधी मनही दुखाव,
टचकन डोळेही भरावेत,
ओघळावेत तुटलेल्या मनाची आसावे डोळ्यातून,
मग बंद भावनांचे सगळेच तुटावेत.

आयुष्यभर पुरेल एवढ दुःख असावं
ओठावरच्या हास्यांपुढे ते ना कोणा दिसाव,
सोडून सगळ्यांना कधीतरी
त्याच्या आठवणीत सगळं काही फिकं दिसावं.
                           

घाव शब्दांचे असे मनाला व्हावेत
हळूच कुणाच्या प्रेमाचीहि भीती वाटावी,
कधी त्याच्या आठवणीतील आसवे 
अन  एकटेपणात गालावर यावी.

आयष्य मात्र भरभरून असावं,
मात्र मन कधीच आपलं नसावं,
जगण्याच्या प्रत्येक क्षणाला
त्याच्या नसण्याचं दुःख असावं,

हसावं त्याच्या आठवणीत अन भरावेत डोळे
व्हाव्यात मरण  यातना निरागस मनाला
गुरफटून जावं दुःखात अन जवळ मात्र कोणी नसावं
तुटलेच मन कधी तर हे असच असावं अन
त्याच्या नसण्याने मात्र जगणं अधुरं लागावं
               ----------------------------------सोपान  नांगरे