तडका - दुष्काळ भावनांचा

Started by vishal maske, December 01, 2018, 08:18:08 AM

Previous topic - Next topic

vishal maske

दुष्काळ भावनांचा

नाते जरी तेच असले तरीही
मनं मात्र हल्ली बदलले आहेत
माणूसकीच्या फिलिंग्स मधून
माणसं बघा आदळले आहेत

अहो पुर्वी माणसांच्या जाण्याने
गावंच्या गावं ओसाड व्हायची
गांवचा माणूस मेला तरीही
गांवभर लोक देखील रडायची

पण आता परिस्थिती बदलली
भावनांचा तुटवडा भासत आहे
गेला तो सोडून देऊन पुढे चला
हे वास्तव समाजात दिसत आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३