तीनोळी -तीनोळ्या -लेख - "चांद रात"

Started by Atul Kaviraje, June 14, 2021, 11:50:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             तीनोळी -तीनोळ्या -लेख
                             ---------------------


     1) चांद  रात
           हातात  हात 
                भांडणाला  सुरुवात . 
==================

मित्र /मैत्रिणींनो  ,

     पौर्णिमेचा  पूर्ण  चंद्र  नभी  उगवला आहे . टिपूर , दुधाळ  चांदणे  सभोवार , सर्वत्र  पडले  आहे . सारा  आसमंत  दुधिया  प्रकाशात  न्हाऊन  निघाला  आहे . चंद्राचा  पडलेला  चंदेरी  प्रकाश , या  साऱ्या  वातावरणाला  चार -चांद  लावीत  आहे . अश्या  या  रम्य , हव्या  -हव्याश्या  निसर्ग  - रम्य , रोमँटिक  वातावरणात , नवरा  - बायकोने  थोडसं  संसारातून  लक्ष्य  बाजूला  करून , फिरायला  गेलं  तर  काय  वाईट  आहे  ? यात  काय  चुकलं  ?

  रोज  रोजच्या  त्या  कामाच्या  , संसाराच्या  राम -रगाड्यातून  माणूस  हे  सुवर्ण -क्षण  शोधीतच  असतो , या  चंदेरी  रूपाने  त्यास  ते  लाभत  असतात , त्याचा  तो  कधी  कधी  फायदा  घेत , त्यात  पूर्णपणे  मिसळून  जात , भव -पाशातून  थोडीशी  का  होईना  पण  मुक्ती  मिळवण्याचा  प्रयत्न  करीत  असतो . तर ,  आपले  हे  तथा -कथित , नवरा -बायको  बऱ्याच  वर्षांनी , या  टिपूर  चांदण्यात  फिरायला  निघाले  आहेत  बरं , आणि  तेही  हातात  हात  घालून . ते  जुने  तारुण्याचे  दिवस  आठवून , ती  दोघे  अधिकच  भावुक  होत  आहेत , त्या  आठवणींना  पुन्हा  फिरून  उजाळा  मिळत  आहे .

   परंतु , माणसाचा  गुण -धर्म  किंवा स्वभाव  त्यास  स्वस्थ  बसू  देईल  तरच  नवल . बायकोचे  मन  आहे  घरी मुलांकडे ,तर  नवऱ्यास  अजूनही  चांदण्यात  फिरायचं . हा  विरोधा -भास  त्या  दोघात  हळू -हळू  वाद - विवाद  निर्माण  करू  पहातो . बायकोला  चिंता   आहे , मुलांच्या  जेवणाची , अभ्यासाची  आणि  उद्याची  देखील , तर  नवरा  या  संसारातून  मुक्त  होऊन , चांदण्यांचे  पंख  लावून , स्वेर  उडू  पहातोय.
झालं , बायकोचे  आपणाकडे  लक्ष्य  नाही  असे  पाहून , त्याला  राग  येतो . कारण  विचारता , त्याला  वर  सांगितल्याप्रमाणे  उदाहरणे , कारणे  बायकोच्या  तोंडून  ऐकावयास  मिळतात . त्याच्या  रागाचा  पारा  आणखीनच  चढतो . आपण  येथे   सारे  सारे  विसरून  आलोत , आणि  तुझे  मन  त्या  जंजाळातच  अजून  घोटाळतंय , या  वरून  त्या  दोघांत  वाद  सुरु  होतात , आणि  एखाद्या  "घर  घर  कि  कहानी " असल्यासारखे  त्या  दोघांत  चक्क  भांडण  सुरु  होते . त्याला  तिचं  पटत  नाही , आणि  तिला  त्याचे . आपण  का  आलो  होतो , आणि  आपण  काय  करतोय , याचं  त्यांना   आता  भान  नाहीय . आपापले  मुद्दे  पटवून  देण्यासाठी , ते  कोणत्याही  विकोपाला  जात  आहेत.

     तर  मित्रानो , ही  आहे  घरा -घराची  न  संपणारी  गोष्ट . माणसाचा  मूळ  स्वभाव  त्याला  उगी  राहू  देत  नाही . पौर्णिमेच्या  पूर्ण  चंद्राचा  आनंद  घेण्याचे  दूरच  राहिले , उलट  येथे  नवरा -बायकोच्या  भांडणाला  तोंड  फुटलंय . त्यामुळे  हे  सामान्य  माणसा , हातात  हात  घालून  पूर्ण  चांद  रातीला , फिरण्याचे  खतरनाक  विचार  सोड , आणि  मुकाट  घरी  बसून  जे  होईल  ते  शहाण्या  मुलासारखे  पहात  राहा , हेच  तुझ्या  हाती  आहे .

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.06.2021-सोमवार.