II स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा.II- (लेख क्रमांक-2)

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 02:58:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                II स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा.II
               ----------------------------------------
                              (लेख क्रमांक-2)
                             -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज १५, ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी भावांस आणि कवयित्री भगिनींस, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वाचूया, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाची माहिती आणि महती.

     १५ ऑगस्टचा सोहळा : १५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये आम्ही काय सुधारणा केल्या आहेत आणि काय करणार आहोत हे राष्ट्राला कळवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहण होते. राष्ट्रगीत होऊन प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात आणि नंतर प्रमुख पाहुण्यासहित कार्यक्रमाला जातात. त्या दिवशी दिल्लीत म्हणजे आपली राजधानीत तसेच सर्व शाळांमध्ये व कॉलेजामध्ये नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. लहान मुलांना झेंडे घेऊन नाचत फिरताना पाहून खूप मजा वाटते. सगळी कडे झेंडा वंदनाचे कार्यक्रम होतात. स्वतंत्र देशांचे स्वतंत्र नागरिक म्हणून मिरवताना खूपच अभिमान वाटतो. त्या दिवशी भारत सरकार अनेक व्यक्तींना राष्टीय पुरस्कार देतात. असा हा स्वातंत्र्योत्सव आपण साजरा करीत असताना आपल्या लोकशाही देशाबद्दल पण आपल्याला गर्व वाटतो. आपली स्वतंत्र घटना आहे, आपल्या देशात न्याय संस्था आहे ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो.


                        स्वतंत्रता दिवस माहिती:-----
                       ----------------------   

   आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट १९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या एतिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्ला "स्वातंत्र्य दिन" म्हणून साजरा करतो. माणूस असो वा देश असो स्वातंत्र्या सारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतात राज्य केले. तेवढ्या काळात आमचा ईतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनी केले. भारतात शिक्षणाचा प्रचार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुणांना  पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकर्यांना लुबाडले. स्व:त मालकीच्या चहाच्या मळ्यांची भरभराट साधण्यासाठी भारतीयांना चहाचे व्यसन लावले. असा अनेक प्रकारे भारतीयांना लुबाडले. इंग्रजांचा कावेबाजपणा ओळखणार्या काहींनी त्यांच्या विरुद्ध शस्त्र उगारले. १८५७ स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई,नाना साहेब पेशवे यांनी गाजविले. पुढे सशस्त्र उठाव करून वासुदेव बलवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. आपला निषेध शस्त्रांद्वारे नोंदविला. काहींनी इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकर, धिंग्रा यांनी तसेच प्रयत्न केले. लोकजागृती झाली, पण ती दडपली गेली. रानडे, टिळक,गोखले,आगरकर यांनी लेखणीचे आणि वाणीचे सामर्थ वापरून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम यांची जनतेला जाणीव करून दिली. भारतीय समाजाला आपली स्थिती सुधारण्याची प्रेरणा, जाणीव करून दिली. फुले इ. च्या शिकवणीने जातीय भेदाभेद किती वाईट आहे व त्याने समाज कसा दुर्बल होतो हे लोक शिकले. कित्येक क्रांतीकारी फासावर गेले. टिळकांनी, सावरकरांनी आणि अशा अनेक क्रांतीवीरांनी तुरुंगवासातच उमेद घालविली. परंतु इंग्रजांनी यावर अधिकारपदे, मोठमोठ्या पदव्या, हक्क नसलेल्या कमिट्या यांच्या उपायांनी भारतातील जनतेत फुटाफुट निर्माण केली. फोडा आणि झोडा हे त्यांनी त्यांची सत्ता कायम ठेवण्यासाठी वापरलेले तंत्र होते. पुढे महात्मा गांधीच्या कडे देशाचे नेतृत्व आल्यावर पूर्वीच्या प्रयत्नांचा उपयोग होत नाही, असे पाहून त्यांनी सत्याग्रहाच्या व अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. त्याबरोबरच स्वदेशी, स्वालंबन, असहकार अश्या मार्गांनी सर्वत्र भारतीयांना इंग्रजां विरुद्ध आंदोलन करायला शिकविले. सरकारी जुलमी कायदे, अन्याय, नोकऱ्या याविरुद्ध सत्याग्रहाची मोहीम सुरु केली. गांधीजींना जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ.नी सहकार्य केले. सुभाषचंद्र बोस यांनी मोठ्या धाडसाने इंग्रजांच्या विरोधात "आझाद हिंद फौज" उभी केली. अश्या प्रकारे अनेकांनी भिन्न भिन्न मार्गाने व अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले .आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे. आता भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे ते केलेच पाहिजे!


              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीजानकारी .इन)
            ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.