"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-भाषण क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:03:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                          भाषण क्रमांक-3
                                ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या जबाबदारी खाली 2 वर्ष 11 महीने आणि 7 दिवसाच्या काळामध्ये संविधानाची निर्मिती करण्यात आली.

     26 नोव्हेंबर 1949 रोजी आधिकृतपने संविधानाचा स्वीकार करण्यात आला. व 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावानी करण्यात आली.

     प्रत्येक भारतीयाचे जणू जीवनशैलीत बदल संविधानाने नागरिकांना विविध हक्क प्रदान केले त्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला जो न्याय, समानता, स्वातंत्र, बंधुत्व अशा कितीतरी हक्कांचा समावेश होतो.

     संविधानामुळे प्रत्येक व्यक्ती या खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली. आजच्या काळामध्ये बहुतांश व्यक्ती स्वतःच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून घेत आहे. दिवसेंदिवस आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला कलंक लावणाऱ्या ठरीत आहेत.

      देशातील जातीय दंगली, दहशतवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार वैगेरे-वैगेरे पाहिल्यास प्रश्न पडतो की, हाच तो क्रांतीकारकाचा स्वप्नातला भारत का? याचसाठी महापुरुषानि अथक परिश्रम घेउन आपल्याला स्वतंत्र दिले आहे का? आजच्या काळातल्या व्यक्ती हा स्वातंत्र्याचे महत्त्व आहे आपल्याला देण्यासाठी त्यांनी स्वतः प्राणांची पर्वा केली नाही, मग आपण असं वागून आपल्या देशाचे नाव का खराब करावे? हा विचार प्रत्येकाने करायला हवा.

     मित्रांनो आपला भारत देशा खूप पवित्र आहे आपल्या भारत देशाची संस्कृती, सभ्यता जगभरात जपली जाते. कित्तेक देशातील लोक आपल्या देशाची कौतुक करतात मग आपण आपल्या देशाचे निवासी आसून देशाचे नाव खराब करणे हे कितपत बरोबर आहे?

     प्रजासत्ताक देशाचे पावित्र आपन सर्वानी राखलेच पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार जसे आपल्याला माहिती आहे. तसेच कर्तव्य ही आपण जनून घेतले पाहिजे. व त्याचा आदर केला पाहिजे.

     देशांमध्ये येणाऱ्या समस्या ही माझी समस्या आहे हे समजून आपण ते सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. मी माझा भारत देशाचा नागरिक आहे व देशाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे ही भावना देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात रूजायाला हवी.देशाचा प्रत्येक देशबांधव माझा बांधव आहे. असे वागून संविधानाचा सन्मान करुया.  देशाचे तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे, त्यामुळे आजच्या तरूण पिढीला योग्य शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गावर घेऊन जायला पाहिजे.

     सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा नायनाट करुण लोकशाही बळकट करुया. आपल्या भारत मातेला अभिमान वाटेल असे वागुया.

     भारत मातेला स्वतंत्र करून देण्यासाठी कित्येक क्रांतिवीरांच्या स्वतःच्या प्राण्याची आहुती दिली. त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट कधीही विसरता कामा नये आणि आपल्या भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आणि स्वातंत्र होणयासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करायला हवा.

     जेव्हापासून आपला देश एक प्रजासत्ताक बनला. तेव्हापासुन आपला भारत खुप प्रगतशील राष्ट्र बनला आहे. आपला भारत एक शेतिप्रधान राष्ट्र आहे. मि एका उन्नतशील, स्वतंत्र्य, व प्रजासत्ताक राष्ट्रात राहतो. याचा माला फार अभिमान आहे. व या मंगलप्रंसंगी तुम्ही सर्वजन उपस्थित राहिलात. याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन करुन मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम लावतो.

--जय हिंद! जय भारत!


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-खासमित्र.कॉम)
                         ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.