"०१-एप्रिल–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, April 01, 2022, 02:08:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०४.२०२२-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "०१-एप्रिल–दिनविशेष"
                                     ---------------------


अ) ०१ एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.

१९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.

१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.

१९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.

१९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.

१९३७: रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.

१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.

१९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.

१९७६: ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.

१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.

२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

=========================================

ब) ०१ एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १६५७)

१६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)

१८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १८९८)

१८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९४०)

१९०७: भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.

१९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)

१९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.

१९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.

=========================================

क) ०१ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   -------------------------

१९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

१९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)

१९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.

२०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)

२००३: गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.

२००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९२५)

२०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन. (जन्म: १८ मार्च १९२१)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.04.2022-शुक्रवार.