१४-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 14, 2022, 08:07:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२२-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "१४-एप्रिल–दिनविशेष"
                                    ---------------------


अ) १४ एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

१७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.

१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.

१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

=========================================

ब) १४ एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१६२९: डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध क्रिस्टियन हायगेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १६९५)

१८९१: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)

१९१४: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

१९१९: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)

१९१९: भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७५)

१९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)

१९२७: विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म.

१९४२: केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म.

१९४३: वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म.

=========================================

क) १४ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१९५०: भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. (जन्म: ३० डिसेंबर १८७९)

१९६२: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: १५ सप्टेंबर १८६०)

१९६३: इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९३)

१९९७: चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी यांचे निधन.

२०१३: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९३०)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2022-गुरुवार.