मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-16-माझे गाव

Started by Atul Kaviraje, October 29, 2022, 09:07:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-16
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे गाव"

     आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते. यामागील कारण असे आहे की भारतातील लोकसंख्येचा 2 तृतीयांश भाग गावात राहतो. गाव भारताचा पाठीचा कणा आहे आणि गावातील 90 टक्के लोक शेती व पशुपालनावर अवलंबून आहेत. म्हणून भारतातील गाव देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताला कृषिप्रधान देश म्हणूनही ओळखले जाते. गावातील लोक शहरातील लोकांच्या तुलनेत साधारण आणि चिंतामुक्त जीवन व्यतीत करतात. कोणी तरी म्हटले आहे की भारताला जर ओळखायचे असेल तर गावांमध्ये जाऊन पहा. गावांमध्ये अजुनही आपली संस्कृती जिवंत आहे.

     माझ्या गावाचे नाव लोणी आहे. हे गाव जळगाव जिल्ह्यापासून 40 किलोमीटर दूर आहे. माझ्या या गावात सर्व जाती धर्माचे लोक सोबत राहतात. माझ्या गावात जवळपास 300 घरे आहेत आणि येथील लोक मोठ्याप्रमाणात शेत व्यवसाय करतात. माझ्या या गावात कोणताही कार्यक्रम असो सर्व लोक सोबत येऊन साजरा करतात. गावातील लोकांमध्ये मोठी एकजुटता आहे म्हणून सर्वजण एकमेकांसोबत मिळूनमिसळून गुण्यागोविंदाने राहतात.

     माझ्या गावात शिक्षणाचा मोठा विकास झाला आहे. येथे शासनाद्वारे 10 वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. शिक्षणासाठी गावात आजूबाजूच्या गावातील मुलेही शिक्षण येतात. शासनाने आमच्या गावच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांवर पक्के काम केले आहे. ज्यामुळे बाहेरील लोकांना गावात येण्यात अडचण होत नाही. आमच्या गावात एक आयुर्वेदिक रुग्णालय उघडण्यात आले आहे. ज्यात गावातील लोक इलाज करण्यासाठी येतात.

     माझ्या गावात एक ग्राम पंचायत आहे. या पंचायतीत गावातील भांडणे सोडवली जातात. आमच्या गावात एक लहान पोस्ट ऑफिस देखील आहे, जेथे बँकेतील पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. माझ्या गावातील जास्त लोकसंख्या शेतावर निर्भर असल्याने गावात खूप सारे शेत आहेत, जेथे मक्की, गहू, भुईमुग, बाजरी इत्यादी पिके लावली जातात. सिंचनासाठी गावातील शेतात ट्युबवेल लावली आहे. परंतु जास्तकरून शेत पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. म्हणून जर पाऊस आला तर शेत चांगले होते नाहीतर बऱ्याचदा शेतातील पीक खराब होऊन जाते. म्हणून आमच्या गावातील जास्तकरून लोक गरीब आहेत.

     शासनाच्या प्रयत्नामुळे आमच्या गावात मोबाईल टॉवर, वीज व आधुनिकीकरणाची साधणे उपलब्ध होत आहेत. माझे गावात हिरवळ आणि सुंदरता भरलेली आहे. आमचे गाव एक आदर्श गाव आहे.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.10.2022-शनिवार.