३१-ऑक्टोबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, October 31, 2022, 09:38:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३१.१०.२०२२-सोमवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "३१-ऑक्टोबर-दिनविशेष"
                                 ------------------------

-: दिनविशेष :-
३१ ऑक्टोबर
जागतिक एकात्मता दिन
जागतिक बचत दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९८४
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
१९८४
भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
[कार्यकाल: ३१ डिसेंबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९]
१९६६
दिल्ली उच्‍च न्यायालय
दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
१९४१
माऊंट रशमोअर
हवाई छायाचित्र
'माऊंट रशमोअर' या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले. ४ ऑक्टोबर १९२७ रोजी याच्या बांधकामास सुरुवात झाली होती. अमेरिकेच्या साऊथ डाकोटा राज्यातील कीस्टोन परगण्यात ब्लॅक हिल्स या डोंगरावर हे शिल्प कोरले आहे. यात जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझव्हेल्ट आणि अब्राहम लिंकन (डावीकडून उजवीकडे) असे अमेरिकेचे चार राष्ट्राध्यक्ष साकारण्यात आलेले आहेत. सुरुवातीला हे शिल्पामध्ये अर्धपुतळे बनवण्याची योजना होती, परंतु निधीच्या कमतरतेमुळे ते मधेच थांबवण्यात आले. या भागातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी म्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता आणि तो चांगलाच यशस्वी झाला.
१९२०
AITUC Logo
नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
१८८०
धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल' या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१८७६
भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
१८६४
नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४६
रामनाथ पारकर
रामनाथ पारकर – क्रिकेटपटू
(मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)
१८९५
सी. के. नायडू
कोट्टारी कनकय्या तथा सी. के. नायडू – क्रिकेटपटू, भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले कप्तान, पद्मभूषण (१९५६)
(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७ - इंदौर, मध्य प्रदेश)
१८७५
सरदार वल्लभभाई पटेल
१९४९ मधील छायाचित्र
वल्लभभाई झंवरभाई पटेल तथा सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर - १९९१)
(मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
१३९१
एडवर्ड
एडवर्ड – पोर्तुगालचा राजा
(१४ ऑगस्ट १४३३ ते ९ सप्टेंबर १४३८)
(मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१९
गिरीजा कीर
गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार
(जन्म: ५ फेब्रुवारी १९३३ - धारवाड, कर्नाटक
२००९
सुमती गुप्ते
सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार आणि रसरंग दादासाहेब फाळके पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी १९४० मध्ये संत ज्ञानेश्वर या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल टाकले. भालजी पेंढारकर यांच्या 'थोरातांची कमळा' या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. राजा परांजपे यांच्या 'ऊन पाऊस' या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध महिलेची भूमिका केली होती. या भूमिकेचे आजही प्रचंड कौतुक होते. संत ज्ञानेश्वर (१९४०), थोरातांची कमळा (१९४१), माझे बाळ (१९४३), शरबती आँखे (१९४५), संतान (१९४६), वीर घटोत्कच (१९४९), नंद किशोर (१९५१), शिव लीला (१९५२), श्यामची आई (१९५३), ऊन पाऊस (१९५४), समाज (१९५४), शेवग्याच्या शेंगा (१९५५), कारिगर (१९५८), मौसी (१९५८), कीचक वध (१९५९), वक्त (१९६५), सज्जो रानी (१९७६), हरे काच की चुडिया (१९६७), परिवार (१९६८), प्रार्थना (१९६९), अधिकार (१९७१), जलते बदन (१९७३), पेसै की गुडिया (१९७४), आदमी सडक का (१९७७), फासी का फंदा (१९८६), पवनाकाठचा धोंडी, शेवटचा मालूसरा, कुंकवाचा करंडा, दाम करी काम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयाबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा', 'जानकी' आणि 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. मराठी चित्रपटांप्रमाणेच 'लग्नाची  बेडी', 'घराबाहेर', 'संशयकल्लोळ' इत्यादी नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
(जन्म: ११ मे १९१९ - वाई, जि. सातारा)
२००५
अमृता प्रीतम
अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या 'कागज ते कॅनव्हास' या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. 'रसीदी टिकट' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(जन्म: ३१ ऑगस्ट १९१९ - गुजरानवाला, पंजाब (पाकिस्तान)
१९८६
आनंदीबाई शिर्के
आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका
(जन्म: ३ जून १८९२)
१९८४
इंदिरा गांधी
भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली.
(जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)
१९७५
सचिन देव बर्मन
सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक
(जन्म: १ आक्टोबर १९०६)
१८८३
स्वामी दयानंद सरस्वती
मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक
(जन्म: १२ फेब्रुवारी १८२४ - तनकारा, मोर्वी, राजकोट, गुजरात)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.10.2022-सोमवार.