मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-118-प्लास्टिक मुक्त भारत-प्लास्टिक बंदी

Started by Atul Kaviraje, February 08, 2023, 09:36:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-118
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "प्लास्टिक मुक्त भारत-प्लास्टिक बंदी"

     आजच्या काळात प्लास्टिक प्रदूषण एक समस्या बनली आहे. आज प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक चा वापर वाढत आहे. भाजीपाला म्हणा की किराणा, प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जातात.

     प्लास्टिक च्या अतिवापराने निसर्गाला खूप नुकसान होत आहे. आज आपण प्लास्टिक मुक्त भारत या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत. प्लास्टिक कधीही सडत नाही व त्याला पूर्णपणे नष्ट करणे देखील कठीण आहे. म्हणून आज आपण प्लास्टिकचे दुष्परिणाम मराठी व प्लास्टिक बंदी चे फायदे पाहणार आहोत.

     प्लास्टिकचा उपयोग आज प्रत्येक ठिकाणी केला जात आहे, भाजीपाला किंवा घराची कोणतीही किराणा वस्तू घ्यायला बाजारात गेल्यावर प्लास्टिक ची पिशवी दिली जाते. प्लास्टिकच्या अतिवापराने निसर्गाला नुकसान सहन करावे लागत आहे. मनुष्याने प्लास्टिकचा शोध लावला आहे, परंतु हा शोध मनुष्यासाठीच हानिकारक सिद्ध होत आहे. प्लास्टिक कधीही सडत नाही. प्लास्टिकला जमिनीमध्ये टाकल्याने झाडांच्या मुळांना ते नुकसान पोहोचवते.

     आज भारतच नव्हे तर संपूर्ण जगात प्लास्टिक चर्चेचा विषय बनला आहे. वाढत्या प्रदूषणात प्लास्टिकचे मोठे योगदान आहे. म्हणून जर आजच प्लास्टिक च्या उपयोगाला आळा घातला गेला नाही तर भविष्यात मानवी जीवन मोठ्या संकटात येईल.

     आपल्या देशाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. जसे शक्य होईल तेवढा प्लास्टिक बॅग चा उपयोग कमी करा, भाजीपाला किंवा कोणताही किराणा आणण्यासाठी कागदी अथवा कपड्याची बॅग वापरा. आज-काल लग्नसमारंभात जेवणासाठी प्लास्टिकच्या युज अँड थ्रो प्लेट वापरल्या जातात. परंतु या एवजी आपण पारंपरिक मातीचे भांडे किंवा केळीचे पान वापरू शकतात. शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा उपयोग कमी करा. असे केल्याने प्लास्टिक ची समस्या आपोआप कमी होईल.

     भारत शासनाने प्लास्टिक मुक्त भारत या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोंबर 2019 ला देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये केली. सुरवातीला आग्रा, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, लखनऊ या शहरांमध्ये प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिक ऐवजी कापडी किंवा कागदी वस्तूंचा उपयोग सुरू झाला. नंतरच्या काळात हे अभियान संपूर्ण देशात पसरले. परंतु तरीपण आजही अनेक लोक प्लास्टिक च्या पिशव्यांचा मोठ्याप्रमाणात वापर करीत आहेत. एका सर्वेनुसार लक्षात आले आहे की भारतात प्रतिदिन 16000 टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली जाते. हा प्लास्टिक कचरा नद्या व परिसराला प्रदूषित करीत आहे. प्लास्टिक स्वच्छ पाण्याला दूषित करते ज्यामुळे बऱ्याचदा पाण्यात असणारे जीव व मस्यांचा मृत्यू होतो. दूषित पानी प्यायल्याने समाजात रोगराई पसरण्याची शक्यता असते. 

     प्लास्टिकच्या वाढत्या समस्येपासून वाचण्यासाठी स्वच्छ भारत आणि प्लास्टिक मुक्त भारत यासारखे अभियान यशस्वी करणे आवश्यक आहे. भारत शासनाने प्लास्टिकच्या विरोधात कठोर कायदे बनवायला हवेत. प्लास्टिकचा उपयोग जेवढा टाळता येईल तेवढा टाळायला हवा व अधिकाधिक लोकांना प्लास्टिक चे दुष्परिणाम सांगून जागृत करायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.02.2023-बुधवार.
=========================================