मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-119-प्लास्टिक मुक्त भारत

Started by Atul Kaviraje, February 09, 2023, 10:23:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-119
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "प्लास्टिक मुक्त भारत"

     प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. संशोधनातून लक्षात आले आहे की देशात मागील दोन दशकांमध्ये प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लास्टिक हे वापरात सोपे आणि स्वस्त असते यामुळेच लोकांमध्ये प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तूंची लोकप्रियता आहे.

     लोकांची वाढती मागणी पाहून प्लास्टिक बनविणार्‍या कंपन्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या कंपन्यांनी आपले उत्पादन देखील वाढवले आहे. प्लास्टिक मुळे कचरा वाढतो व प्लास्टिक प्रदूषणासारखी भीषण समस्या उभी राहते. या समस्या जनजीवनावर संकट वाढवण्यासोबतच अनेक रोगांना आमंत्रण देतात.

                   प्लास्टिक उत्पादन:--

     प्लास्टिक ची योग्य विल्हेवाट लावण्याप्रमाणेच त्याचे उत्पादन देखील तेवढीच गंभीर समस्या आहे. प्लास्टिकच्या उत्पादनात वेगवेगळ्या प्रकारचे जीवाश्म इंधन जसे तेल आणि पेट्रोल वापरले जातात. या जीवाश्म इंधनांचा पुनर्वापर शक्य नसतो आणि पेट्रोल व खनिज तेलासारखी ही इंधने भक्त करणे पण कठीण असते म्हणून जर आपण अशाच पद्धतीने प्लास्टिकचा वापर करत राहू तर तो दिवस दूर नाही जेव्हा हे सर्व संसाधन समाप्त होऊन जातील.

                समुद्री जीवनावर प्लास्टिकचा प्रभाव--

     प्लास्टिक बॅग, अन्य प्लास्टिक कण तसेच पाण्याच्या बाटल्या हवा तथा पाणी द्वारे समुद्र आणि महासागरात पोहोचतात. पाण्यामध्ये हे कण मिसळल्याने समुद्रामधील पाणी दूषित होते आणि जर हे प्लास्टिक चे कण मासे, कासव आणि अन्य समृद्धी जीवांचा पोटात गेले तर त्यांच्या मृत्यू होतो. दरवर्षी कितीतरी समुद्री जीव प्लास्टिकमुळे मारले जातात.

                    मनुष्य व प्राण्यांवर प्लास्टिकचा प्रभाव--

     समुद्रातील प्राण्यांप्रमाणेच प्लास्टिक प्रदूषण मनुष्य व धरतीवर राहणाऱ्या प्राण्यांनाही हानीकारक आहे. प्लास्टिक मध्ये असलेले कचरा अन्न समजून खाल्ल्याने दरवर्षी हजारो पशूंची मृत्यू होते. हे प्लास्टिक त्यांच्या आतड्यांमध्ये अडकून जाते. वेळेनुसार प्लास्टिक कचरा अधिक खराब होत जातो. त्यामुळे त्यात डास, माश्या आणि दुसऱ्या प्रकारचे किडे तयार व्हायला लागतात. या मुळे माणसामध्ये रोगराई पसरते.

                  प्लास्टिक प्रदूषण संपविण्यासाठी सामूहिक प्रयत्न--

     प्लास्टिक पदार्थांची पूर्णपणे विल्हेवाट लावणे कठीण कार्य आहे. जेव्हा प्लास्टिकचा कचरा पाण्याच्या स्त्रोतांजवळ पोहोचतो तेव्हा ही समस्या अधिक बिकट होऊन जाते. कागद व लाकडा प्रमाणे प्लास्टिकला जाळून समाप्त करता येत नाही. प्लास्टिक जाळल्याने वेगवेगळ्या प्रकारचे हानीकारक गॅस निर्माण होतात. हे गॅस पृथ्वीच्या वातावरणाला हानिकारक असतात. यामुळे प्लास्टिक पृथ्वी, पाणी व हवा तिन्ही प्रकारचे प्रदूषण वाढवतो.

     आपण कितीही प्रयत्न केला तरी प्लास्टिक उत्पादनांना पूर्णपणे बंद करणे कठीण आहे. परंतु आपण प्लास्टिक चे उत्पादन नक्कीच कमी करू शकतो. प्लास्टिक पासून बनलेल्या वस्तू जसे प्लास्टिक बॅग, डब्बे, ग्लास, बाटली इत्यादी गोष्टींचा वापर कमी करावा. या ऐवजी पर्यावरणासाठी अनुकूल असणारे उत्पादन जसे कपडे, पेपर बॅग, स्टील, तांबे व माती पासून बनलेली भांडी वापरावीत.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.02.2023-गुरुवार.
=========================================