मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-140-मोबाइल: श्राप की वरदान

Started by Atul Kaviraje, March 05, 2023, 10:28:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-140
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "मोबाइल: श्राप की वरदान"

     मोबाईल मध्ये असलेल्या ॲप्स च्या मदतीने आपण ऑनलाइन खरीदारी करू शकतात. पूर्वीसारखे बाजारात जाऊन तासनतास वस्तू शोधण्याची आता गरज नाही. घरबसल्या मोबाईलवर आपण योग्य वस्तू शोधू शकतात व तिला ऑनलाईन ऑर्डर करू शकता. पैसे पाठवण्यासाठी देखील आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. मोबाईल मध्ये असलेल्या ऑनलाईन पेमेंट अँप च्या मदतीने घर बसल्या आपल्या बँक खात्यातून पैसे पाठवता येतात.

     मोबाईल चे खूप सारे फायदे आहेत. जर कोणाला तात्काळ मदत हवी असेल तर इमर्जन्सी नंबर जसे पोलीस, ॲम्बुलन्स यांना फोन करून बोलवता येते. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. दररोज लोक सोशल मीडियावर आपले फोटो टाकत असतात. कमेंट्स च्या माध्यमाने एक दुसऱ्याच्या फोटो बद्दल कमेंट पण करतात. आशा भरपूर पद्धतीने आज मोबाइल कहा वापर केला जात आहे.

     मोबाईल चे अनेक फायदे आहेत. पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. मोबाइल द्वारे ब्लॅकमेलिंग चे प्रकार खूप वाढले आहेत. अनेक शिकलेले आई वडील हे कामावरून आलेत की मोबाइल मध्ये व्यस्त होऊन जातात. ज्या मुळे घरातील लहान मुलांना आपल्या आईवडीलांसोबतचा वेळ मिळत नाही. सध्याच्या काळात सण उत्सव आणि वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश ऑनलाईन मोबाइल मध्ये पाठवले जातात म्हणून आधी सारखा एक दुसऱ्याला प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद अनुभवता येत नाही.

     आज मोबाईलच्या अतिवापराने अनेकांना त्याचे व्यसन जडत आहे. युवकांमध्ये तर हे प्रमाण अधिकच वाढत आहे. दीर्घकाळ मोबाईलवर गेम खेळणे, इंटरनेट वापरने यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी, डोळे चुरचुरणे यासारख्या समस्या वाढीस लागतात. खूप साऱ्या लोकांना रात्री झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवण्याची सवय असते, पण असे केल्याने कॅन्सर चा धोका वाढतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो व झोप कमी होते. मोबाईलचा जास्त वापराने शाळकरी विद्यार्थ्यांची एकाग्रता देखील कमी होते. परिणामी त्यांना अभ्यास लक्षात राहत नाही. म्हणून कामापेक्षा जास्त वेळ मोबाइल वापरणे घटक ठरू शकते.

     यात शंका नाही की मोबाईलचे खूप सारे फायदे आहेत व मोबाईल एक महत्त्वाचे साधन देखील आहे. पण कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. मोबाईलच्या बाबतीत देखील तसेच आहे. एकीकडे याचे सकारात्मक परिणाम आहेत तर दुसरीकडे नकारात्मक प्रभाव देखील आहेत. म्हणून मोबाइल चे फायदे आणि तोटे तरुण पिढीला समजावून सांगणे महत्वाचे आहे. जर योग्य पद्धतीने मोबाइल वापरला गेला तर तो नक्कीच एक वरदान म्हणून समोर येईल. परंतु चुकीचा वापर करणाऱ्यांसाठी मोबाइल हाच त्यांच्या आणि समाजाच्या पतनासाठीचा सर्वात मोठा श्राप ठरेल.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.03.2023-रविवार.
=========================================