भारताचा स्वातंत्र्य दिवस-कविता-10

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:36:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही कविता.

                                 "देशभक्ती कविता"
                                ------------------

साऱ्याच देश देशाहून सुंदर असा

प्राणाहुन प्रिय भारत देश माझा

कोटी कोटी प्रणाम करितो आम्ही

स्वीकार आमचा प्रणाम धरतीमाता



नंदनवन जशी धरती आमची

त्यात फुलली रंगीबिरंगी फुले

विविध भाषा, धर्म, वेशभूषेची

एकात्मतेच्या सुंगधाने धरती दरवळे



सौख्य, समृद्धी देशात नांदती

शांतीचा संदेश जगात घुमतो

हिरव्या शिवारी पिके डोलती

बंधुभावाचे गाणे वारे गातो



शूरवीरांची पवित्र ही जन्मभूमी

बलिदान दिले अनेक वीरांनी

तिरंगा फडकतो अभिमानाने

त्या हिमालय पर्वतावरी



किती महती गावी या देशाची

केले उपकार अनंत आमच्यासाठी

पांग फेडण्यासाठी दे एक संधी

प्राणही पणाला लावू देशासाठी

--आम्रपाली घाडगे
----------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरीमिरर.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================