भारताचा स्वातंत्र्य दिवस-देशप्रेमावरील सुविचार

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 12:12:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे देशप्रेमावरील सुविचार.

     देशावरील आपलं प्रेम व्यक्त करा, हे देशप्रेमावरील सुविचार (Independence Day Marathi Quotes On Patriotism) शेअर करून. 

=========================================
ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..'सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो....जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो... मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण...माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा...एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा...भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.

पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.

काळ्या गोऱ्याचा भेद नाही
मनाशी आपलं नातं आहे
दुसरं काही नाही येतं आम्हाला
पण प्रेम निभावता येत आहे
वाका आणि सलाम करा त्यांना
ज्यांच्यामुळे आज तुम्ही स्वतंत्र आहात
नशीबवान असतात ते ज्यांचं रक्त
देशाच्या कामी येतं
जय हिंद जय भारत

मी भारत देशाचा अविरत सन्मान करतो
इथल्या मातीचं मी गुणगान करतो
मला चिंता नाही स्वर्गात जाण्याची किंवा मोक्षाची
तिरंगा माझा कफन व्हावं हीच इच्छा आहे माझी
लहरेल तिरंगा आता साऱ्या आकाशावर
भारताचं नाव असेल सगळ्यांच्याच ओठावर
घेऊ समोरच्याचा जीव आपल्या जीवाची बाजी लावून
जो वाईट नजरेने बघेल माझ्याच्या देशाच्या भूमीवर
=========================================

--आदिती दातार
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================