हरितालिका-माहिती-15

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:27:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

             हरतालिका व्रताची तारीख, शुभ वेळ आणि उपासना पद्धत जाणून घ्या--

         हरतालिका कधी आहे--

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 8 सप्टेंबर, बुधवारी रात्री 2:33 वाजता उशिरा रात्री सुरू होईल. ही तारीख 09 सप्टेंबर रोजी दुपारी 12:18 वाजता संपेल. अशा स्थितीत हा उपवास 09 सप्टेंबर रोजी उदय तिथीला ठेवला जाईल.

            हरतालिका शुभ मुहूर्त--

हरतालिकेच्या पूजेसाठी दोन शुभ मुहूर्त येत आहेत. पहिला शुभ मुहूर्त सकाळी आणि दुसरा प्रदोष काल म्हणजे सूर्यास्तानंतर.

           सकाळचा मुहूर्त--

हरतालिकेची पूजा करण्याची शुभ वेळ सकाळी 06.03 ते 08.33 पर्यंत आहे. तुम्हाला पूजेसाठी मिळणारा एकूण वेळ 02 तास 30 मिनिटे आहे.

             प्रदोष काळ पूजा मुहूर्त--

पूजेची शुभ वेळ संध्याकाळी 06.33 ते 08.51 पर्यंत आहे.

               हरतालिका महत्त्व--

     हरतालिका व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभतं. असे मानले जाते की हे व्रत केल्याने एखाद्याला योग्य वरही मिळतो. या उपवासाच्या प्रभावाने संतानसुखही मिळतं.

             हरतालिका पूजा विधी--

या दिवशी वाळूने महादेवाची पिंडी, पार्वती आणि सखीची प्रतिमा तयार केली जाते.

हरतालिका पूजा करण्यापूर्वी गणपतीचे आव्हान केले जातात. विड्यांच्या पानावर खारीक, बदाम, शिक्का ठेवून सुपारीच्या रूपात गणपतीची स्थापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते.

गणपतीला अभिषेक करून, जानवं, शेंदूर, लाल फुलं, दूर्वा, नैवेद्य अर्पित केलं जातं.

नंतर वाळू निर्मित प्रतिमेवर महादेवाला स्नान करवून त्यांना बेलपत्र, शमीपत्र आणि फुलं अर्पित केलं जातात.

या दिवशी महादेवाला विविध पत्री अर्पित करण्याचे अत्यंत महत्त्व आहे.

महादेवांची विधीपूर्वक पूजन केल्यानंतर देवी पार्वती आणि सखीची पूजा केली जाते. त्यांना शृंगारांच्या वस्तू अर्पित केल्या जातात.

नंतर नैवेद्य दाखवून आरती आणि कहाणी केली जाते.

या दिवशी रात्री देखील आरती करून जागरण करतात.

दुसर्‍या दिवशी दही-कान्हवलेचे नैवेद्य दाखवून व्रताचे समापन केलं जातं.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================