श्रीगणेश चतुर्थी-निबंध-6

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 11:10:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीवर निबंध.

                गणेश चतुर्थी निबंध--

     गणेश चतुर्थी हा आपल्या भारतातील लोकांचा सगळयात जास्त आवडता सण तसेच उत्सव आहे.

     म्हणुन हा सर्वत्र खुपच आनंद अणि उत्साहाने साजरा केला जातो.लहान असो किंवा मोठा सगळयांनाच गणपती आगमनाची आतुरता लागलेली असते.

     भाद्रपद शुदध चतुर्थीला सनई अणि चौघडा या दोघांच्या आवाजात,ढोल ताशांच्या आवाजात गणपती बाप्पाचे आगमन यादिवशी केले जात असते.

     गणेश चतुर्थीस आपण विनायक चतुर्थी असे देखील म्हणत असतो.गणेशोत्सव सुरू होण्याच्या १५ ते २० दिवस आधी बाजारात गणपतीच्या भव्य दिव्य विविध आकाराच्या उंचीच्या मुर्ती विकायला आलेल्या आपणास दिसुन येतात.

     घराघरात देवहारयात गणपतीची मुर्ती बसविली जाते.अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळ मिळुन एकच मोठी मुर्ती बसवली जात असते.गणपतीस हार,दुर्वा तसेच फुले अपर्ण करण्यात येतात.

     गणपती बाप्पाची घरोघरी सर्व कुटुंब मिळुन मनोभावे अणि मोठया श्रदधेने अकरा दिवस सकाळ संध्याकाळ पुजा आरती केली जाते.गणपती बाप्पापुढे मोदक,लाडु,खीर अशा इत्यादी गोडपदार्थाचा नैवैद्य दाखवला जातो.

     गणपती सोबत गौरीचे देखील आगमन होत असते.सर्व घरातील महिला वर्ग मोठया श्रदधेने भक्तीने गौरीचे पुजन करतात.तिच्या आगमनासाठी घराची साजसजावट करतात.

     हा सण उत्सव गणेश चतुर्थी पासुन अनंत चतुर्दशी पर्यत अकरा दिवसांकरीता मोठया उत्साहात अणि आनंदात जगभर साजरा केला जात असतो.

     गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा भारतामध्ये लोकमान्य टिळक यांनी देशातील जनतेला एकत्र आणण्यासाठी संघटीत करण्यासाठी त्यांच्यात ऐक्य निर्माण करण्यासाठी सुरू केली होती.

     गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिनी जागोजागी विविध गणेश मंडळाकडुन भव्य डेकोरेशन केले जाते.हे डेकोरेशन पाहण्यासाठी लोग लांब अंतरावरून येत असतात.

     ह्या डेकोरेशनमध्ये सामाजिक ऐतिहासिक अणि पौराणिक देखावे देखील उभारले जात असतात.यातुन लोकजागृती केली जाते.लोकांपर्यत एखादा चांगला सामाजिक संदेश पोहचवला जातो.

     दहा दिवसानंतर अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन केले जाते.काही जण आपल्या घरातील गणपती विसर्जित करायला स्वता नदीत जातात तर काहीजण जवळच्याच गणेशमंडळाकडे गणपतीची मुर्ती विसर्जन करण्यासाठी या दिवशी देऊन देतात.

     मग रात्री बारा ते दोन पर्यत सर्व गणेशमंडळाकडुन आपापल्या मंडळाच्या गणपतीच्या मुर्तीचे अर्धा लाडु फुटला गणपती बाप्पा उठला,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा नारा देत नाचत कुदत पाण्यात विसर्जन केले जाते.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-वेबशोध इन मराठी.कॉम)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================