ऋषीपंचमी-माहिती-5

Started by Atul Kaviraje, September 20, 2023, 05:18:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "ऋषीपंचमी"
                                       -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०९.२०२३-बुधवार आहे. आज "ऋषीपंचमी" आहे. असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना ऋषीपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, ऋषीपंचमी वर महत्त्वाची माहिती.

           ऋषिपंचमी आरती –

जय जय ऋषिराजा, प्रभु जय जय ऋषि राजा ।

देव समाजाहृत मुनि, कृत सुरगया काजा ।।

जय दध्यगाथ वर्ण, भारद्वाज गौतम ।

जय श्रृंगी, पराशर अगस्त्य मुनि सत्तम ।।

वशिष्ठ, विश्वामित्र, गिर, अत्री जय जय ।

कश्यप भृगुप्रभृति जय जय कृप तप संचय ।।

वेद मन्त्र दृष्टावन, सबका भला किया ।

सब जनता को तुमने वैदिक ज्ञान दिया ।।

सब ब्राह्मण जनता के मूल पुरुष स्वामी ।

ऋषि संतति, हमको ज्ञानी हों सत्पथगामी ।।

हम में प्रभु आस्तिकता आप शीघ्र भर दो ।

शिक्षित सारे नर हो, यह हमको वर दो ।।

धरणीधर कृत ऋषिजन की आरती जो गावे ।

वह नर मुनिजन, कृपया सुख संपत्ति पावे ।।

ऋषि पंचमी ऋषिची भाजी का केली जाते?

     ऋषिपंचमीला हे व्रत घरातील सुहासिनी, कुमारिका त्याचप्रमाणे पुरुष देखील करतात. या दिवशी उपवास केला जातो. असे म्हटले जाते की, या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये. असे देखील म्हटले जाते की, बैलाचे पाय धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्नपदार्थ ऋषिपंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाही. म्हणूनच या दिवशी शेताच्या बांधावर उगवलेल्या रानभाज्या, कंदमुळे तसेच कष्टाने लावलेल्या झाडांची मुळे, भाज्या यांचा वापर करून ऋषीची भाजी तयार केली जाते. या सर्व भाज्या शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठेमध्ये देखील विकायला उपलब्ध असतात.

           ऋषीपंचमीला ऋषी भाजी करताना कोणत्या भाज्या मिक्स कराव्या?--

     श्रावण, भाद्रपदच्या दरम्याने पावसाळा असतो. आणि पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध असतात. त्यामुळे या भाज्यांचा वापर ऋषीपंचमीच्या भाजी मध्ये केला जातो. कोकणात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि ऋषी पंचमीच्या या भाजीचे सुद्धा यादिवशी विशेष महत्व आहे.

     ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात. आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनविली जाते. या दिवशी ठरावीक रानभाज्या, निरफणस, भेंडी, वांगी, गवार अशा भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनविली जाते.

     त्यात लाल भोपळा, पडवळ, दोडकी या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ या पालेभाज्यांचा वापर केला जातो. त्याच बरोबर अंबाडी सुद्धा घातली जाते. अळूची पानं, बटाटा, लाल माठ, रताळं, कच्ची केळी, सुरण, लालभोपळा, शिराळी, लाल माठाचे देठ, कणीस, शेंगदाणे, ओले मटार, शिमला मिरची, टोमॅटो, खोबरं घालतात. मिरच्या घालतात. यात मुख्य भाजी ही अळूची असते. त्यात या सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2023-बुधवार.
=========================================