दिन-विशेष-लेख-गुरू तेग बहादूर शहीदी दिवस-A

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:24:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                            "गुरू तेग बहादूर शहीदी दिवस"
                           -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे. २४ नोव्हेंबर, हा दिवस "गुरू तेग बहादूर शहीदी दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत--(लेख क्रमांक-१)

11 ऑगस्ट 1664 च्या दिवशी दिल्लीतील शिखांचा एक जत्था पंजाबच्या दिशेनं रवाना झाला.

हा जत्था निघण्यापूर्वी सहा महिने शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांनी बकालामध्ये त्यांचा उत्तराधिकारी मिळेल असं सांगितलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर हा जत्था पंजाबमधील बकाल गावाच्या दिशेनं निघाला.

बकाल गावात शिखांची एक विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत तेग बहादूर यांना शिखांचे पुढचे गुरू म्हणून घोषित करण्यात आलं.

या पारंपरिक समारंभात गुरदित्ता रंधावा यांनी नव्या गुरूंच्या कपाळावर भगवा नाम ओढून त्यांना नारळ आणि पाच पैसे दिले आणि त्यांना गुरूच्या गादीवर बसवलं.

सुरुवातीच्या काळात गुरू तेग बहादूर फारसे बोलके नव्हते. खुशवंत सिंह त्यांच्या 'ए हिस्ट्री ऑफ द सिख्स' या पुस्तकात लिहितात, "गुरू तेग बहादूर अत्यंत नम्र स्वभावाचे असल्याने सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. धीरमल यांनी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही."

खुशवंत सिंह लिहितात, "तेग बहादूर बकाला सोडून अमृतसरला आले, पण हरमंदिर साहिबचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले गेले. मग ते तिथून त्यांच्या वडिलांनी वसवलेल्या किरतपूर गावी गेले. तिथूनच पाच किलोमीटर अंतरावर त्यांनी आनंदपूर नावाचं नवं गाव वसवलं."

आज या ठिकाणाला आनंदपूर साहिब या नावाने ओळखलं जातं. पण इथंही त्यांच्या शत्रूंनी त्यांना सुखानं राहू दिलं नाही.

         गुरु तेग बहादूर यांना अटक--

शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांचे सर्वात धाकटे पुत्र म्हणजे गुरू तेग बहादूर. त्यांचा जन्म 1621 साली झाला.

आनंदपूरमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांनी गुरु तेग बहादूर यांच्या मनात पूर्व भारताला भेट देण्याचा विचार आला.

ते पूर्वेकडे निघाले असताना, वाटेत आलम खानच्या नेतृत्वाखाली मुघल सैनिकांनी त्याला अटक करून दिल्लीला परत आणलं.

गुरू तेग बहादूरांना अटक का झाली याबद्दल इतिहासकारांच्यात आजही एकमत नाहीये. खुशवंत सिंग लिहितात, "मुघलांचा दरबारी राम रायने त्यांना अटक करवली. गुरु तेग बहादूर यांनी शांततेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला."

इतिहासकार फौजा सिंग मात्र या याच्याशी सहमत नाहीत. ते म्हणतात, तोपर्यंत रामराय तेग बहादूर यांना आपला गुरू मानू लागले होते, त्यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता.

            औरंगजेबासमोर हजर केलं--

सरबप्रीत सिंग त्यांच्या 'स्टोरी ऑफ द शिख्स' या पुस्तकात लिहितात, "त्यांच्या अटकेची कारणं काही असो पण 8 नोव्हेंबर 1665 ला गुरु तेग बहादूर यांना अटक करून दिल्लीला नेण्यात आलं. आणि त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं."

गुरू तेग बहादूर सम्राट औरंगजेबाशी बोलताना म्हणाले की, "भले ही माझा धर्म हिंदू नसेल, भले ही मी वेदांच्या श्रेष्ठतेवर, मूर्तीपूजेवर आणि इतर चालीरीतींवर माझा विश्वास नसेल पण हिंदू आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर आणि हक्कांसाठी मी कायमस्वरूपी लढेन."

--Author-रेहान फझल
---------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-बी बी सी.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================