माझा एकटेपणा

Started by rups, December 18, 2010, 10:31:24 AM

Previous topic - Next topic

rups

कोणी सोबत नसल तरी , तरी तो माझ्या सोबत असतो 
झालेच कधी दु:ख अनावर , तर येउन हलकेच अश्रु पुसतो .
कोणी नाही म्हणून काय झाले , "मी आहे ना " म्हणतो ,
कितीही जण असतील सोबत तरी , तोच एकटा मला जाणतो .
 
               कधी आनंदाची उघडून कवाड , मी जाते दुस-यापाशी,                पण ते रमलेले त्यांच्याच विश्वात पाहून, मी परत येते होते तशी . 
              मग तो म्हणतो,"उदास नको होऊ, मी आहे ना तुझ्याजवळ , 
              सांग मला तुझा आनंद , माझ्यात विरून जाइल तुझी कळ " .
कधी एखादा क्षण हळवा , भिजवतो डोळ्याची पापणी, 
ओघळले जरी लाख अश्रु , पुसाया नसते कोणी , 
मग परत जवळ येतो तो , माझे अश्रु वाटुन घेतो ,
शब्दानच्याही पलीकडचा आनंद , ओंजळीत माझ्या देऊन जातो.     

              कधी येतो खुप राग ,पण हक्काच माणूस नसत काढायला , 
              उधाणलेल्या त्या सगारामधून , मला किनारी आणून सोडायला .
              पण अशा वेळी माझ्याबरोबर , खुप खोल तो येतो , 
              करुन माझे सांत्वन ,हळूच मिठीत त्याच्या घेतो .       
कधी चलबिचल होते मनाची , अन वाटते खुप अस्वस्थ 
पण बोलायला समोर कोणीच नसत, सगळे आपल्याच विश्वात मस्त .
तेंव्हा मन माझे जाणायाला , तो माझ्या जवळ येतो , 
झेलुनी दु:ख अंतरीचे , मला बोलकेपण तो देतो.     

              कधी ओथंबतात भावना , अन अडतात  मनाच्या दारी , 
              सचून राहतात तशाच मनी , जरी सोबत असतील सारी. 
              अशा वेळी त्याच्या  मनाचे दार , तो माझ्यासाठी उघडतो , 
              मग मानून समाधान , मनाचा पारवा त्यातच बागड़तो .         
वाटत असेल वाचताना , खरच कोण असेल तो ? 
एवढा सांभाळून घेणारा , खरच खुप गुणी दिसतो . 
पण खरतर ह्या जगात , कोणीच कोणाच नसत , 
असेलच कोणी सोबत तर , केवळ मृगजळच असत.     

              म्हणुनच मी स्वीकारली सोबत त्याची ,   
              खात्री आहे मला तो कधी नाही सोडणार ह्याची .
              कोणाला पटेल किंवा नाही पटणार कुणा , 
              आयुष्यभर अन आयुष्यानंतर सोबत राहील " माझा एकटेपणा "
   
आयुष्याच्या वाटेवरती मी खुपदा अडखळले ,
रस्ता वाळणाचा होता जरी, सोबत होते सगळे. 
पण राहिला अखंड सोबत, तो माझा एकटेपणा, 
व्यापुनी सारी धरती , त्याने जिंकले आहे मना.     

              लोकाना नको वाटतो एकटेपणा , पण तोच खरा सोबती , 
              क्षण दोन क्षण सोबत देणारी, सारी खोटी असतात नाती . 
              कितीही आली संकट , तरी नाहीं झीजणार ज्याचा  कणा. 
              असा माझा अखंड सोबती , " माझा एकटेपणा "!!!!!!!!!!!!     
रूपा

Rahu

तुमची कविता.... छान आहे...
वास्तविक आहे...