"मैत्री हि फक्त मैत्रीच असते."

Started by charudutta_090, February 14, 2011, 08:11:04 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साई
"मैत्री हि फक्त मैत्रीच असते."

एक रेशीमगाठ जी कधीच सुटत नसते,
ती भावनिक तार,जी कधीच तुटत नसते;
जी कोणत्याच अटींवर कधीच सुत्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

ती जी फक्त जिवलग्यास जोडत असते,
एकदा जुड्ल्यास कधीच परत तोडत नसते;
जणू मैत्री नात्याला सावली देणारी छत्रीच असते,
तीच मैत्री, हि फक्त मैत्रीच असते.....

भंग व्हायला अपेक्षा कधी ठेवतच नसते,
इतक्या हलक्या विचारांना सेवतच नसते;
जी फक्त निरापेक्षित प्रेमाचं चांदणं देणारी रात्रीच असते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

ती मैत्रीच काय जी गमती समजत नसते,
ती यारीच काय जी नातं दृढता उमजत नसते;
काय ती वरपांगी क्षणिक दिखाऊ नाती,ज्याची खात्रीच नसते,
कारण,मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

मैत्री जी कधीच कोणतं घेणं नसते,
जी उदात्त मनी फक्त देणं असते;
जी गैरसमज या शब्दाला जोपासेल,इतकी भित्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

आजन्म हे मैत्री रोपटं,अपत्यागत जी जोपासते,
त्याची सर्व प्रयत्नी निरोगीकता तपासते;
जी किंतु-किडीत फांदीला कापती कात्रीच असते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

संकुचित छोटं मन ठेऊन जगणारे,मैत्री समजू शकतच नाही,
कारण त्यांच्यात मैत्री-नातं पेलण्या इतकी ताकातच नाही;
कारण,पण व परंतु,या नकारार्थी शब्दाला जी कधीच मात्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

मैत्री शिक्षा-ओझं नसून,ती कायम क्षम्यच असते,
मैत्र-जीवाच्या मन-रानि,कायम हिरवी रम्य असते;
जी कोणत्याच नियम बांधिलकीला शास्त्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

ती काहीच आठवडे टिकेल,इतकी मन-पाणी उथळ नसते,
बर्फाखडीत सहज विरघळेल,कधीच इतकी पातळ नसते;
जी विशाल अंतःकरणी मित्राच्या,कायम मिठीस पात्रीत असते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

पाषाणरूपी पाझरत्या झर्याला आटवेल,इतकी कोरडी निश्चित नसते,
कायम चिटकून राहणाऱ्या सावली प्रमाणे,या नात्यास अश्वित असते;
जी जुळल्या नाती सहज तुटेल,कधीच इतकी ढिली गात्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

मित्राचं प्रेम लाथाडेल इतकी,कपाळ-करंटी नसते,                   
एक घाव दोन तुकडी ठेचेल इतकी पाटा वरवन्टी नसते;                                   
विश्वास,प्रेम,माया,याच भावनांनी जी कायम मंत्रित असते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते...
चारुदत्त अघोर.(द.१४/२/११)