अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी......................

Started by kalpeshkolekar, May 29, 2011, 12:23:04 AM

Previous topic - Next topic

kalpeshkolekar

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले...... 'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद   झाला तरी डोळ्यातुन बाहेर, दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर, कोणीच   कसे नाही थांबवत आपल्याला, किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला, खुप विचार करून तो बोलला, रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा, सान्त्वनांचे बोल आपण, अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे, दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व, आपल्याला नाही कोणी थांबवु शकत, बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक   आपण मनातील वेदनांचा, नाजुक धागा वचनातील बंधनांचा, भावबंध ह्र्दयातील   रुदनांचा, स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा , म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे, आपल्यामुलेच आज हे जग आहे. अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुची वाणी अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................