आठवण

Started by Ashwinii Narsule, August 05, 2011, 01:19:01 PM

Previous topic - Next topic

Ashwinii Narsule

आठवण

आठवण कोणाची जेव्हा येते तेव्हा मन सैरभैर होते,
काहीच कळत नाही त्याला असे का त्याला होते.

आठवण कोणाची जेव्हा येते मन त्याच्या आठवणीत गुरफटून जाते,
आणखीन मग त्याच जाळ्यातून कधी निघता येतच नाही.

आठवण कोणाची जेव्हा येते मन पाखरू बनून भुरकन उडून जाते,
आणखीन वेडी पीसी होऊन त्यालाच सगळीकडे शोधू लागते.

आठवण कोणाची जेव्हा येते सगळा राग रंग बदलून जातो,
ओसाड वाळवंटात ही मग फुलोरा उमलून जातो.

अशी ही आठवण कोणाची जेव्हा येते तेव्हा मन आठवणींच्या दुनियेत रंगून जाते

अश्विनी नरसुले

mahesh4812

sundar....kharech athvan ali manapasun kunachi, ki agdi assech hote...


manoj vaichale

आठवण कोणाची जेव्हा येते सगळा राग रंग बदलून जातो,
ओसाड वाळवंटात ही मग फुलोरा उमलून जातो.
खुपच सुंदर

Ashwinii Narsule


sachin.dange007@gmail.com

athwan ali ki tila visarnyatach shahanpana asto ...nahi tar khup traaas hoto ...karan mla mahit ahe ki ti mazi hou shakt nahi..................