मैत्री

Started by gparimal_v, September 16, 2011, 07:38:45 AM

Previous topic - Next topic

gparimal_v


जगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते।
मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते।

जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती।
पैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती।

शेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे।
त्यासाठी जोडावे जगताना जिवलग मित्र खंदे।

मैत्रीचा हा महिमा आणखी वर्णावा किती।
मित्रांची साथ मिळता न उरे कळिकाळाची भिती।


©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१ / ०९  /२०११

केदार मेहेंदळे