त्सुनामी

Started by mayuravalvi, October 01, 2011, 01:09:45 AM

Previous topic - Next topic

mayuravalvi

       ।।त्सुनामी ।।

ते सारे लोक राहत होते सुखाने ,
सागर  तीराचे जीवन जगत होते आनंदाने ।।

समुद्र हा पिता होता हो त्यांच्या सोबती ,
सहवासात त्याच्या कसली नव्हती भीती ।।

पहाटेची गोड स्वप्न पाहत होती भविष्याची ,
चाहुल नव्हती त्यांना येणाय्रा अनिष्ठांची ।।

लाटांच्या नादाने होत सुरूवात दिवसाची ,
गार वारा किणाय्राचा घेत भेट गळ्याची ।।

तालात असता लाटा बेसुर आज का झाल्या ,
घेऊण अनिष्ठ संगे तांडव करत आल्या ।।

पित्याचे विद्रोही रूप त्यांनी पाहिले ,
होते नव्हते सारे त्याचे पाण्यात वाहिले ।।

गार वारा किणाय्राचा का मंद आज झाला ,
भेट घेण्या ऐवजी अश्रु देऊण गेला ।।

आयुष्याच्या वाटेवर काय आता करायचे ,
जगायचे मरायचे कि , विलुप्त व्हायचे ।।

दैवाच्या विधीला का डरायचे ,
उत्साहाने होडी पुन्हा सागरात न्यायची दुर्दैवी नशीबावर कर्त्तत्वाने मात करायची ।।


।। हर्षता  भाईदास  सैंदाने ।।